अंजीर हे सुपरफूड मानले जाते. तुम्ही फळ आणि ड्राय फ्रूट म्हणून अंजीर नक्कीच खाऊ शकता. पण वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर नक्की खालले पाहिजे. 1-2 अंजीर दररोज पाण्यात भिजवून सकाळी खावेत. मात्र, अंजीर भिजवलेले पाणी प्यावे की फेकून द्यावे हे काही लोकांना माहित नाही.
तुम्ही 2-3 अंजीर घेऊन ते ते रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवावे. रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी प्रथम ते अंजीर खावून घ्या. यानंतर अंजीर भिजवलेले पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल.
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. अंजीर हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. अंजीर खाल्ल्याने शरीराला कॅरोटीन, ल्युटीन, टॅनिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड मिळते. अंजीराचे सेवन फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. मधुमेही रुग्णही अंजीर खाऊ शकतात. जर तुम्ही फळ म्हणून ताजे अंजीर खाल्ले तर ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पॅन्टोथेनिक ॲसिड, पायरीडॉक्सिन, नियासिन आणि फोलेट्स पुरवतात.