वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी मोदींवर टीका केली आहे. ‘भारतातील मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने X वर पोस्ट केले. १० वर्षात भाजपने जे नियम बनवले की त्याचा परिणाम आणि नुकसान हे मुस्लिमांना होतो. तीन तलाक कायद्याच्या नियमाने शिक्षा दिल्यानंतर कुणी कसे जेलमध्ये राहून बायकोला पैसे देणार. हे फक्त मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बनवले. मोदी आणि आमित शहा यांनी एवढी घाण तयार केली. पाच वर्षापासून मुस्लीम, इसाई आणि आदिवासी सडत आहेत. मला भीती आहे की या सप्टेंबरमध्ये सेंसेंस काम करणार यावेळी NPA NRC काम सुरू होणार आणि नंतर आपल्याला पुरावे मागितले जाणार. तुमचे पूर्वज कुठे जन्मले असे विचारले जाणार. जिथं जिथं भाजपचे सरकार आहे तिथं लव्ह जिहादचा कायदा बनवला. गोरक्षकांना पैसे दिले जातात. बंदुकांचे परवाने देतात. काही ठिकाणी निकाह न करण्याचा नियम काढला आहे. भाजप या देशाला हिंदू राष्ट्र बनवत असून मुस्लिमांना त्रास देत आहे. रेल्वेने जाणाऱ्या म्हाताऱ्या माणसाला मारले आणि म्हणाले की तुम्ही तक्रार करू नका नाहीतर मारून टाकेल.’
‘गोरक्षक म्हणण्या पेक्षा राक्षस म्हणू. गौ राक्षस ने 30 km पर्यंत फायरिंग केली. तेव्हा एक मुलगा मेला आणि हरियाणा पोलीस म्हणाली की ते चांगले गौरक्षक आहेत. चुकून गोळी लागली. 8 वर्षाच्या मुलगा घेऊन आई गेली तर त्याला शाळेतून काढले आणि म्हणाले की हा डब्ब्यात मास आणेल आणि धर्म परिवर्तन करेल. तर यावर अद्याप गुन्हा झाला नाही. म्हणाले हा मोठा झाल्यावर राडे करणार. नरेंद्र मोदी यांनी तेढ निर्माण केली. याला जबाबदार हे मोदी आहेत. आधी पण तेढ होता मात्र मोदींनी खूप तेढ वाढवली आहे. आमची वक्फची प्रॉपर्टी हे हिसकावून घेणार असे म्हणाले. ती आमची मुस्लिमांची प्रॉपर्टी असून अलाहची प्रॉपर्टी हा मोदी हिसकावून घेत आहे.’
‘राज्यात शिंदेंचे खासदार म्हणाले की कायदा बनायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६५२ ऐकर जमीन रत्नागिरीत दिली होती. तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असते तर मोदींच्या कायद्याला विरोध केला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिर बनवत असताना मस्जिद बनवली. हे कोण लोकं आहेत जे मशिदिना हात लावतात ? महाराष्ट्रात ५३४११ हेक्टर जमीन वक्फची आहे ही जमीन मोदी हिसकावनार आहेत. वक्फ बोर्डाच्या कमिटीत RSS आणि भाजप विचाराचे लोकं बसवत आहेत.’
‘काशी विश्वनाथ आणि तामिळनाडूत हे त्यांच्या मंदिर कमिटीत मुस्लीम सदस्य बनू शकत नाही. उत्तर प्रदेश, ओडिसा येथे आमच्या वक्फ बोर्डात येऊन म्हणतात की हिंदू सदस्य असतील. मोदी कोण आहेत आमच्यात लुडबुड करणारे. ज्यांच्या घरात महिला नसेल तर त्याला कुणी हक्क देत नाही. इतर मुली महिलांचे अधिकार हिसकावून घ्यायचे. उत्तर प्रदेशात ९०% प्रॉपर्टी वक्फची प्रॉपर्टी आहेत. हे म्हणतात वक्फ बाय युजर नाही होणार. कायदा बनला आणि नंतर तुम्ही रजिस्टर करायला गेले तर तुम्हाला कागदपत्र विचारले जाणार. कागद आणि मगच रजिस्ट्रेशन होणार. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा खोटारडा आणि जालीम आहे. स्वतंत्र मिळाल्यानंतर तुम्ही मशिदीचे काय केले. आता मला बोलायला लावू नका. भारतीय पुरातत्व विभागाकडून आपल्या जमिनी हिसकावल्या जाणार आहेत. मोदीजी मौलाना आहेत त्यांना उर्दू ज्ञानात PHD मिळाली. ‘
‘RSS वाले BJP वाले शिंदे वाले खोटारडे आहेत. वक्फची प्रॉपर्टी ही खाजगी आहे. तुम्ही यात असे हस्तक्षेप करू शकता ? आपण एका मशिदिला गमावले आता किती मशिदी गमवणार ? तुमचे मन भरले नाही का ? आमच्या मशिदी तोडून ,आमचे रक्त सांडून, तुमचं मन भरले नाही का ? आम्ही आमचं अस्तित्व मिटू देणार नाही. जे आम्हाला बरबाद करायला आले त्यांना आम्ही बरबाद करणार. इम्तियाज जलील यांना विधानसभेत निवडून आणायचे आहे. कधी आपल्या लोकांना आपलेसे करा. यांना आपण पराभूत करु. आम्ही लढत आहोत लढत राहणार. मोदी कायदा बनवत आहेत तर आम्ही रस्त्यावर जावून स्वतःला संपवू मात्र आल्लाहची जमीन जावू देणार नाही. अल्लाह आम्हाला जिवंत ठेवून ते दृष्य नको दाखवू. तुझ्याच जमिनी कुणी हिसकावेल. मोदी हा फक्त आपली संपत्ती हिसकवण्यासाठी कायदा बनवत आहे.’