नाकाबंदीदरम्यान 5 कोटींची कॅश जप्त, ही गाडी कोणाची होती त्याबद्दलचा तपास सध्या सुरू आहे. सदर गाडी मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. मुंबई-बँगलोर हायवेवर खेड-शिवापूरजवळ तपासणी केली असता गाडीत 5 कोटींची रक्कम सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकच्या देवळ्यात भाजपला मोठं खिंडार, भाजपच्या माजी नगराध्यक्षांसह 17 माजी नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे जिल्हा उप्धाध्यक्ष किशोर चव्हाण यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.
जळगावात महायुतीच्या पहिल्याच निर्धार मेळाव्याला भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे दोघेही गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जळगावातील आदित्य लॉन येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा निर्धार मेळावा पार पडत आहे . मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही मेळाव्याला दांडी मारल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
“उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
2019 मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी मला लहान भावासारखं सांभाळलंय. मी उद्या दुपारी 4 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहे,” असं निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
शिवसेनेला न विचारात घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. कायदा हातात घेतलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देणं योग्य नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी मत मांडलं. गणपत गायकवाड यांच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांना आयते मुद्दे मिळतील असे उमेदवार नको असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे.
नाना काटे समर्थकांसह मुंबईत शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. जयंत पाटील यांनी नाना काटे यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. नाना काटे चिंचवडचे समीकरण बदलवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“शरद पवार यांच्यासोबत उत्तम चर्चा झाली. आमच्याकडे चांगले उमेदवार असल्याने आम्ही आग्रही आहोत. प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. आमच्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भात चर्चा झाली,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
पाच कोटी रुपये सापडलेली गाडी काही महिन्यांपूर्वीच मी बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचं अमोल नलावडे यांनी स्पष्टीकरण दिलं. पाच कोटी रुपये सापडलेली गाडी सांगोला इथले उद्योगपती अमोल नलावडे यांच्या नावावर आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले. “मला पोलीस स्टेशन किंवा इतर कोणाचाही अजून तरी फोन आलेला नाही. माझी काही चूक नाही. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाइन पैसे घेतले असल्याने मला काही अडचण येईल असे वाटत नाही. आम्ही काही वर्षांपूर्वी शेकापचं काम करत होतो, मात्र आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही,” असं गाडीमालक अमोल नलावडे यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली- थोड्याच वेळात विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मावळत्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं आहे. यापूर्वी रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच अध्यक्ष म्हणून देखील काम केलं आहे.
आघाडी, युती करतो तेव्हा पुढेमागे करावं लागतं… यूती असते तेव्हा 1 -2 पाऊल मागे यावं लागतं… प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार… असं वक्तव्य अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु… फक्त 5 कोटी रुपये जप्त झाले, 10 कोटी रुपये सोडून दिले… 30 – 30 कोटी सुद्धा आता लवकरच वाटप करतील… सांगोल्याच्या गद्दार आमदारांसाठी रोकड जात होती… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धनराज महाले बंडाच्या तयारीत… दिंडोरीतून धनराज महाले शिंदेंच्या शिवसेनेकडून होते इच्छुक… मात्र दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आणि नरहरी झिरवाळ यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाल्याने महालेंचं बंड… २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धनराज महाले यांचा निर्णय… राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्ही का पाळायचा? धनराज महाले यांचा विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना सवाल…
मुंबईत अनेक ठिकाणी योगींचे पोस्टर लावण्यात आले आहेत… मुंबईतील अंधेरी पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत… होर्डिंग्जवर योगींच्या चित्रासह बंटेंगे तो कटेंगे अशी घोषणा होती… हरियाणानंतर आता योगींचा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरला आहे…
पैलवान या चित्रपटाच्या गाण्याचं अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लाँचिंग… अजीत पवार यांचे खाजगी सचिव अजित सोलवट यांचंही या चित्रपटातून केलंय पदार्पण… काही वेळात अनेक पैलवानांच्या उपस्थितीत गाणं होणार प्रदर्शित
रत्नागिरी विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रांन्त कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रमुख पक्षाचे उमेदवार कधी अर्ज भरणार याची उत्सुकता सध्या सर्वांना आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 विधानसभा मतदार संघ आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच प्रचाराचा नारळ फुटणार आहे. इच्छुक उमेदवारांना 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा कार्यालयात काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. राजापूर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महाविकासआघाडीमध्ये जिल्ह्यातंर्गत धुसफूस समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस वेगळी भूमिका गेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष आणि राजापूरमधून इच्छूक असलेले अविनाश लाड भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे राजापूरमध्ये सांगली पटर्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
राजहंस सिंग, भाजपचे विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग हे डिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, जिथे त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. तर शिंदे सेनेचे राहुल कनाल, जे आदित्य ठाकरे यांचे माजी निकटवर्ती होते आणि आत्ता श्रीकांत शिंदे यांचं जवळचे मानले जातात. त्यांचा कालिना मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पोटणीस यांच्याशी थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे सतीश चव्हाण यांचा प्रवेश लांबला होता. मात्र अखेर हा प्रवेश निश्चित झाला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजीनामे देण्याच्या धमकीमुळे सतीश चव्हाण वेटिंगवर होते. मात्र एक ते दोन दिवसात सतीश चव्हाण यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे येत्या गुरुवारी 24 तारखेला विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात मनसेचे मोठे शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे. मनसे आणि अविनाश जाधव हे ठाणे शहर या ठिकाणी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या समोर अविनाश जाधव पुन्हा एकदा विधान सभा रिगणात उतरणार आहेत. त्याच दिवशी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे देखील कोपरी पाचपाखाडी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात येत असून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत एकूण 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
मविआमधून शरद पवार गटाची माढ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि शरद पवारांची आज भेट होणार. आज शरद पवार-जयंत पाटील यांच्या समवेत भेटीला बोलावल्याची माहिती असून या तिघांमध्ये मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार आमदार बबनराव शिंदेना तिकीट देण्यास सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आमदार शिंदेचा मुलगा रणजितसिंहला तिकीट देण्याचा आग्रह पवारांकडे सुरु असल्याची माहिती tv9 ला सुत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 29 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवार यादी जाहीर करणारा भाजपा पहिला पक्ष ठरला आहे. भाजपाने पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केलेत. भाजपाला उमेदवार यादी जाहीर करण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे सुद्धा आहेत. या यादीमुळे काही ठिकाणी बंडाचे संकेत मिळाले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ज्यांना तिकीट मिळालं, ते आभार मानण्यासाठी आले, तसच ज्यांच नाव जाहीर झालेलं नाही ते सुद्धा होते. दरम्यान राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित यशवंतराव हे आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता होणार प्रवेश. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी प्रवेशावेळी मातोश्रीवर असणार हजर.