राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हरियाणात पोहोचले आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या शपथविधीसाठी अजित पवार चंदिगडमध्ये दाखल झाले आहेत.
चांदवड (नाशिक)- चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी माघार घेतली आहे. कुटुंबात भाऊबंदकी होऊ नये म्हणून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठांची परवानगी घेऊन माघार घेत असल्याचे जाहीर करत नाफेडचे केदा नाना आहेर यांच्या नावाची त्यांनी शिफारस केली.
भाजपच्या काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात असल्याची माहिती आहे. भारती लव्हेकर, राम कदम, सुनील राणे, तमिल सेल्वन, पराग शाह यांचा तिकिट कट होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
भाग्यश्री नवटाके, आयपीएस, तत्कालीन डीसीपी, ईओडब्ल्यू, पुणे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या 2020-21 दरम्यान झालेल्या 1,200 कोटींच्या घोटाळ्याशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासात अनियमितता केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
बीकेसीमधील सोफिटेल हॉटेलमध्ये मविआची जागावाटपासंदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी संजय राऊत, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे अनिल देशमुख, राजेश टोपेसुद्धा बैठकीसाठी दाखल झाले आहेत. आज जागावाटपासंदर्भात शेवटची बैठक होणार आहे.
नवी दिल्ली – आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही. झारखंडमधे देखील आप निवडणूक लढवणार नाही.
आप दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवर फोकस करणार आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी आपचा निर्णय. INDIA आघाडीतील घटक पक्षांच्या दबावापोटी आम आदमी पक्षाने निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आज किंवा उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद घेऊ. जागावाटपावर यआज तोडगा निघाल्यास 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाविकास आघाडीची बीकेसी मधील सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक होत आहे. नाना पटोले , जितेंद्र आव्हाड, संजय राऊत बैठकीसाठी पोहोचले.
विधानसभा आचारसंहिता लागू मात्र राजकीय बॅनर तसेच आहेत. कल्याण 138 विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय बॅनर लागले. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष दुर्लक्ष का ? अशी कल्याणकरांमध्ये चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली – संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीबाबत भाजपची महत्वाची बैठक 21 ऑक्टोबर रोजी भाजप कार्यालयात होणार आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यासाठी केंद्रीय निवडणूक अधिकारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटना सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार. बैठकीत संघटनेच्या निवडणुकीबाबत कार्यशाळा घेण्यात येणार असून सदस्यत्व मोहिमेचाही आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. तर वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Maharashtra Assembly Election 2024 LIVE : वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजप नेत्या शनाया एनसी लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेत्या शनाया एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शनाया एनसी अशी लढत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे सध्या महाविकासआघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकुरांनी नवी खेळी केली आहे आहे. महाविकासआघाडी हे हितेंद्र ठाकुरांच्या बविआ उमेदवारांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालघर जिल्ह्यातील 6 पैकी 3 आमदार हितेंद्र ठाकुरांचे आहेत, ठाकुरांच्या 3 आमदारांना मविआ कडून पाठिंबा मिळाला तर इतर मविआ च्या तीन आमदारांना बविआ पाठिंबा देऊन निवडून आणणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
आमदार सुनिल राणेंचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत याबद्दलची चर्चा रंगली होती. मात्र गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये वाद निर्णाण झाला आहे.
लोकसभेत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापल्यानंतर पुर्नवसन करण्याची मुंबईतील नेत्यांनी विनंती केली आहे. मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. बोरिवली विधानसभेबाबत कालच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. यामुळे आता पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितलं.
न्यायालयाचे काम हे संविधानाला वाचवणे हे आहे. पण सध्या संविधानाची हत्या होत आहे. दोन वर्षांपासून फक्त तारखांवर तारखा दिल्या जात आहे. असे अनेक निर्णय आहेत. – संजय राऊत
नवी दिल्ली : देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. CJI धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची केली शिफारस केली आहे. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस पाठवली आहे. धनंजय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश संजीव खन्ना असतील. संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल
हिंगोलीतील वसमत विधानसभेवर शिवसेना आणि भाजपने दावा केला आहे. शिवसेना पाठोपाठ आता भाजपाचा ही वसमत विधानसभेवर दावा केलाय. महायुतीमध्ये वसमत विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे तयारी करत आहेत. येणाऱ्या काळात वसमत विधानसभेत महायुतित बिघाडी होण्याची शक्यता आहे.
अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती. पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार नाही. ती जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्याने उमेदवार कोण याची चर्चा होत आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे यांनी तयारी केली होती. एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षाने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मतदार नोंदणीसाठी तीन दिवस बाकी 19 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. निवडणुकीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत अर्ज करता येत असल्याने 19 ऑक्टोबर पर्यंत नवीन मतदार होता येणार आहे. लोकसभेत पुणे जिल्ह्याची टक्केवारी घसरल्याने निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. बांदल यांच्यासह हनुमंत शंभाजी खेमधरे, सतीश आणि यतिश जाधव यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एकूण 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली
वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात. अपघातात एक ठार.कारची ट्रकला मागून धडक. समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यातील वलाई गावाजवळ लोकेशन 182 वर झाला अपघात. अपघातात कार चालक ठार. अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर.
आचारसंहितेमुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या तब्बल 35 कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’. सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी. मात्र, निविदा प्रक्रिया, कार्यादेश रखडल्याने लागला ब्रेक. जिल्हा परिषदेकडून प्रस्तावित 203 कोटींच्या कामांपैकी जवळपास 35 कोटींच्या कामांना 45 दिवसांपर्यंत ब्रेक लागणार. 35 कोटीपैकी 30 कोटीची कामे बांधकाम विभागाची आहेत. त्यापैकी काही कामे निविदा प्रक्रियेत, तर काही कामांना कार्यादेश देण्याचे राहिले आहेत.
“जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य” असं शरद पवार म्हणाले.
पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या वाहनाला अपघात. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन झाला अपघात. अपघातात जयश्री मुंडे किरकोळ जखमी. पहाटे 4.30 वाजता झाला अपघात.
मतदार नोंदणीसाठी तीन दिवस बाकी. 19 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार. लोकसभेत पुणे जिल्ह्याची टक्केवारी घसरल्याने निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती नाराजी. विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू.
Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार? याची उत्सुक्ता आहे. लवकरच जागावाटप जाहीर होईल, असं काल महायुती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान रात्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दरम्यान परिवर्तन महाशक्तीची आज पुण्यात बैठक होणार आहे. यात जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. परिवर्तन महाशक्तीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन बैठक आहे. मविआ, महायुतीसह आता ‘परिवर्तन महाशक्ती’ देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. शिवाजीनगर येथे दुपारी ३ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीकरीता छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू,राजू शेट्टी, वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे, नारायण अंकुशे, यांच्यासह समविचारी पक्ष एकत्रित येणार आहेत.