मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या नाकात दम आणला असताना मनोज जरांगे यांच्यासमोर अडचण उभी केली गेली आहे. सोलापूरमधील बार्शीतील एका मराठा नेत्याने आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आठ दिवसांत न दिल्यास ९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मनोज जरांगे यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. यामुळे बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनात बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, मी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले पण त्यांनी उत्तरे दिले नाहीत . मी प्रश्न विचारले ही चूक झाली का? मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला. पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून रात्रदिन राबला आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाचा विरोधात तुम्ही बोलला, त्यांच्या कुटुंबातील लोकविषयीं बोललात. बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ राजेंद्र राऊत आहे, त्यांना सांभाळणारी रणरागिणी ही आमची माऊली आहे. त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे ही तोंड आहे. एक महिन्याची मुदत मला द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण काम करू. मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील, असे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांना विचारलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाही. यामुळे अण्णासाहेब शिंदे आक्रमक झाले आहेत. अण्णासाहेब शिंदे आपल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनाला बसले आहे. बार्शी शहरातील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे आंदोलन सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? यासह अकरा प्रश्न अण्णासाहेब शिंदे यांनी विचारले आहे.
आदरणीय मनोज (दादा) जरांगे पाटील आमच्या शंका दूर करतील का? या शीर्षकाखाली अण्णासाहेब शिंदे यांनी अकरा प्रश्न विचारले आहेत. त्यातील काही प्रश्न…