मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सध्या सर्वत्र बोलबोला सुरु आहे. या योजनेसाठी आता राज्यातील लाखो महिला अर्ज दाखल करत आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. राज्यातील गरीब आणि होतकरु कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या घरात असायला हवं. पण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं जास्त आवश्यक आहे. संबंधित पूर्तता केली नाही आणि तसाच अर्ज दाखल केला तर ती चूक ठरु शकते. यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो, तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता. त्यामुळे अर्ज भरताना काही गोष्टींची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी लाभार्थी महिलेचं बँकेत खातं असणं अपेक्षित आहे. फक्त बँकेत खातं असून चालणार नाही तर महिलेचा आधार क्रमांक त्या बँक खात्याशी जोडला गेलेला असायला हवा. तसं नसेल तर हा अर्ज भरला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थी महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याआधी लाभार्थी महिलेचं बँकेत खातं असायला हवं. तसेच त्या बँक खात्याशी आधारकार्ड नंबर जोडला गेला असायला हवा. त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्याशी त्यांचं आधारकार्ड नंबर जोडला गेला नसेल त्यांनी लगेच ते करणं जरुरीचं आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची अर्थिक मदत मिळणार आहे. पण या योजनेचा लाभ घेणारी महिला ही गरीब कुटुंबातील असायला हवी. या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीत लाखांच्या आत असणं अपेक्षित आहे. तसेच कुटुंबातील कुणी आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्याच्या नावावर कोणतीही चारचाकी गाडी (ट्रॅक्टर वगळता) नसावी. सरकारच्या या अटी पाहता गरीब आणि होतकरु कुटुंबातील महिलांना या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो. या योजनेच्या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काय-काय विचारण्यात आलं आहे याची माहिती आता समोर येत आहे.