मोठी बातमी : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी ठाकरे गट जागा सोडणार?

| Updated on: Oct 19, 2024 | 5:28 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेकडून तशी चाचपणी देखील सुरु आहे. आता माहिती अशी आहे की जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर त्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही. काय आहे बातमी सविस्तर पाहा

मोठी बातमी : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी ठाकरे गट जागा सोडणार?
Follow us on

ठाकरे गट अमित ठाकरे यांच्यासाठी माहिम मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे. अमित ठाकरे जर निवडणूक लढवणार असतील तर माहिममध्ये उमेदवार न देण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली सुरु आहेत. तसेच वरळीमध्ये मनसे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकते. मनसेच्या बैठकीत माहिममधून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी ठाकरे गट उमेदवार देणार नाही.

अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली तर ही शक्यता आहे. भांडूप, माहिम आणि मागाठाणे या तीन मतदारसंघातून चाचपणी सुरु आहे. अमित ठाकरे यांनी माहिममधून निवडणूक लढवावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. अधिकृतरित्या जर अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली तर शिवसेना ठाकरे गट निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

ठाकरे गटाने व्यापक भूमिका घेतली तर ठाकरे गटातील अमित ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघात पाठिंबा देऊ शकते. माहिममधून सध्या सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गट देखील काय भूमिका घेते याकडे ही सगळ्यांचं लक्ष असेल. याआधी वरळीमध्ये मनसेने मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.

बाळासाहेर ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक न लढवता पक्षाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला होता. पण ठाकरे घराण्यातील तरुण पिढीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे.

अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. राज ठाकरे यांनी देखील वरळीत आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी ठाकरे गटाची अपेक्षा असेल. वरळीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीन महिन्यापासून तयारी सुरु केली आहे. वरळी व्हिजनच्या माध्यमातून त्यांनी संकल्प चित्र वरळीकरांपुढे मांडलं होतं. संदिप देशपांडे यांनी अनेकदा ठाकरे गटावर टीका केली आहे.

मनसे नेते यशवंत किलेदार यांनी म्हटलं की, मनसेकडून जय्यत तयारी सुरु आहे. माहिममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करु. त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्हाला आनंद आहे. राज ठाकरे साहेब यांनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम असेल असं ही त्यांनी म्हटले आहे.