मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निर्मिती शिल्पकार जयदीप आपटे याने केली होती. हा जयदीप आपटे कोण आहे? त्यालाच पुतळा बनवण्याचे काम का दिले.? कारण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व्यक्ती आहे, असा थेट हल्ला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. ‘टीव्ही ९ मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात त्यांनी हा हल्ला केला.
जयदीप आपटे याची लिंक कुणाशी आहे. त्याची लिंक स्पष्ट होतेय तो संघाचा आहे. संघाच्या माणसालाच जर राज्याची तिजोरी लुटून देत असाल तर काय होणार? त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ही नौदलाची जबाबदारी आहे. आमची नाही. नौदल म्हणालं, ही सरकारची जबाबदारी दिली. आमची नाही. राज्याचा प्रमुख असं बोलतो.
आमच्या दैवताचा अपमान झाला. तेव्हा आम्ही पोलिसांना महाराजांना नतमस्तक होण्यसाठी परवानगी मागितली. आम्हाला मोर्चा करायचा नव्हता. पण आम्हाला परवानगी दिली नाही. मुंबईच्या रस्त्यावर दोन पावलंही चालण्यासाठी परवानगी हवी आहे. विरोधकांवर बेभान आरोप केला जात आहे. या सरकारची जायची वेळ आली आहे. शेवटचा हातपाय हलवण्याचं काम हे सरकार आहे.
शिवाजी महाराज आणि सावरकर ही तुलना होऊ शकते का. सावरकरांची पुस्तके वाचा. महाराजांबद्दल काय काय बोलले तेही पाहा. मला त्या इतिहासात जायचं नाही. पण सावरकर आणि महाराजांची तुलना होऊच शकत नाही.
अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तो आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. त्यांची जबाबदारी ते घेणार आहे का?. आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे. फक्त ती कायम राहावी. भगिनींची दिशाभूल होऊ नये. बँकेत पैसे गेले. बँकेवाल्यांनी ते गायब केले. आता हे लोक इव्हेंट करत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट केले जात आहेत. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या नावाने योजना आणू. त्यात ३ हजार रुपये देऊ. दरवर्षी १ हजार त्यात वाढ करणार आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.