पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का? टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

| Updated on: Jun 27, 2023 | 10:44 AM

Pune Crime News : पुणे शहरात दहशतवादी टोळ्यांकडून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला जात आहे. काही दिवसांपूर्वी सहकारी नगरमध्ये तलवारीने केक कापण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सोमवारी रात्री गुन्हेगारी टोळक्यांनी दहशत निर्माण केली.

पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का? टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले पुणे. शहरातील वातावरण बदलू लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ अधूनमधून सुरु असतो. पुणे शहरातील गुन्हेगारी थांबण्यात नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. यासंदर्भात बॅनरबाजी केली गेली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसकडून तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. आता पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा आणखी एक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे.

काय केले गुन्हेगारी टोळक्यांनी

पुणे शहरात गुन्हेगारी टोळक्याची पुन्हा धुडगूस घातली आहे. या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर घरावरही दगडफेक केली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्याच्या अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर घरावरही दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी सहकार नगरच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड झाली होती. आता पुन्हा दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आठ दिवसानंतर सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही तोडफोड झाली आहे. यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार तेच असण्याची शक्यता आहे. आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

तलवारीने केक कापला

सहकार नगर परिसरात गुन्हेगारी टोळ्या वाढल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड केल्यानंतर नागरिक संतप्त झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी सहकारनगरमधील भर चौकात गाडी आडवी लावत तलवारीने केक कापत “भाईचा” वाढदिवस साजरा झाला. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला होता. त्यामुळे या गुन्हेगारी टोळ्या पोलिसांसमोर आव्हान बनल्या आहेत. पुणेकरांसाठी पोलीस या टोळींचा कसा निपटारा करणार? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. नागरिकांनी या टोळ्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा