माझे बोलणे झाले ना, मग विषय संपला…मी कधी स्पष्टीकरण करत नाही…राज ठाकरे यांनी टोचले राजकारण्यांचे कान

| Updated on: Oct 07, 2024 | 12:21 PM

mns leader raj thackeray speech: राजकारण्यांना योग्य वेळी ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी होती. ती आज मला कमी दिसते. आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ पाहता महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे, कोणी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आहेत.

माझे बोलणे झाले ना, मग विषय संपला...मी कधी स्पष्टीकरण करत नाही...राज ठाकरे यांनी टोचले राजकारण्यांचे कान
raj thackeray speech
Follow us on

मनसे नेते राज ठाकरे यांनी पुण्यातून आजच्या राजकारण्यांना शालजोडीतले टोमणे मारले. महाराष्ट्रातील आजचे राजकारण पाहिल्यावर भविष्यात राजकारणात कोणी येणार नाही. तसेच या राजकारण्यांना सुधारण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घ्यावी, त्यांना वेळप्रसंगी चार खडेबोल सुनवावे, अशी विनंती केली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होत आहे. त्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या उपस्थित झाले. त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या पद्धतीची भाषा बोलली जात आहे. ज्या पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत, तेथे त्या राजकारण्यांना कान धरुन शिकवणे, सांगणे आणि जमिनीवर आणणे हे साहित्यिकांचे सर्वात मोठे काम आहे. तुमच्याकडे तो अधिकार आहे. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता. तुम्ही बोलताना कधी ट्रोलचा विचार करु नका. मी आजपर्यंत जी भाषणे दिली आहेत, ज्या मुलाखती दिल्या आहेत, त्या पुन्हा कधी वाचत नाही. माझे बोलून झाले ना विषय संपला. मी कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यास जात नाही. मी अब्राहिम लिंकन यांचे एक वाक्य मला आवडते. ते म्हणाले होते, कधीही स्पष्टीकरण करण्यास जावू नका. कारण जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते कधी स्पष्टीकरण मागत नाही. जे तुमचा द्वेष करतात ते तुमचे स्पष्टीकरण ऐकत नाही.

भविष्यात कोणी राजकारण येणार नाही…

साहित्यिकांनी आताचा महाराष्ट्र पाहिल्यावर राजकारण्यांना चार खडे बोल सुनावण्याचे काम करावे. कारण आज राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. त्या राजकारण्यांना समजवणारे कोणी नाही. ज्यांना ज्येष्ठ म्हणावे, तेच त्यांचा आहारी लागले आहे. आता साहित्यिकांनी त्यांना सुधारण्याची जबाबदारी हाती घ्यावी. त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी करावी. सध्याच्या राजकारण्यातील भाषापाहून भविष्यात कोणी राजकारणात येणार नाही.

हे सुद्धा वाचा

ती धमक अन् हिंमत तुमच्यात आहे…

राजकारण्यांना योग्य वेळी ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी होती. ती आज मला कमी दिसते. आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ पाहता महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे, कोणी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक लोक आहे, त्यांना जाळ्यांशिवाय इमारतींवर उड्या मारायला लावले पाहिजे.

राज ठाकरे यांनी म्हटले साहित्यिकांसमोर आपण काय बोलावे. आम्ही त्यांची भाषा वाचून पुढे जातो. त्यामुळे त्यांच्यासमोर आपण बोलयचे नसते. आपण ऐकायचे असते. त्यामुळे आज सर्वात छोटे भाषण मी करणार आहे, असे सुरुवातीलच स्पष्ट केले.