Ramdas Athawale| राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला ; माफी मागण्याची आवश्यकता नाही – रामदास आठवले

| Updated on: Mar 01, 2022 | 4:44 PM

रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होत. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

Ramdas Athawale| राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला ; माफी मागण्याची आवश्यकता नाही - रामदास आठवले
Ramdas Athavale
Follow us on

पिंपरी – राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या(Governor)  बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. रामदास यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. परंतु, रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होत. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale)यांनी दिले आहे.

ठीकठिकाणी झाली आंदोलने

राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांनी ‘चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं. ‘ असे वक्तव्य आपलय भाषणात केल्याने राज्यभर संताप व्यक्त करता. ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली होती. केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यभर निषेध आंदोलने करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल यांची बाजू घेत त्यांच्या वाक्यच विपर्यास केला असल्याची माहिती दिली आहे.

पिंपरीत महापौर भाजपचा

याबरोबरच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये 39 जागा आम्हाला द्या. आणि बाकीच्या तुम्ही घ्या. किती घ्यायचे ते पाहू पण एवढ्या नकोत. ज्या – ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता चांगला झाला आहे. त्या ठिकाणी आम्हाला तिकीट द्या. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणायची आहे. भाजपचा महापौर झाला तर आमचा उपमहापौर झाला पाहिजे. पुण्यात आमचा उपमहापौर आहे. पिंपरीत सत्ता आली तर उपमहापौर आम्हाला पाहिजे, स्टँडिंग आम्हाला पाहिजे. असे मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

Video – पायाला भेगा, हाताला घट्टे हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य, अमरावतीच्या पालकमंत्री ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले

भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?

वधूच्या गेटअपमध्ये मोनालिसा