केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आलं. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे 61 मंत्री आहेत. मित्र पक्षांचे फक्त 11 मंत्री आहेत. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला चांगलं स्थान द्यायला हवं होतं. विधानसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर आम्हाला सन्मान मिळायला हवा होता. आम्ही आमची भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. भाजपने या गोष्टीचा विचार करायला हवा होता, असं शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.