आमदारांना खोके, ‘यांना’ पेट्या तर द्या… चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?

| Updated on: Oct 22, 2022 | 1:28 PM

आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

आमदारांना खोके, यांना पेट्या तर द्या... चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः दिवाळी (Diwali) तोंडावर असतानाच महाराष्ट्रात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. मात्र राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर सडकून टीका केली आहे. दिवाळीत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतीचं नुकसान झालंय. सोयाबीन गेलं.. काहीच नाही राहिलं… हे सरकार काय करतं माहिती नाही. आमचे इथले एक शेती मंत्री आहेत. ते म्हणाले, आणेवारी नाही काढायची, ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही… जसं की यांच्या खिशातून पैसे चाललेत का, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.

या लोकांना आमदारांना खोके देता, शेतकऱ्यांना पेट्या तर द्या. हे नाहीच होते… आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

पाहा चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

Chandrakant Khaire | शिंडे-फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा फरक नाही : चंद्रकांत खैरे-TV9

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी काल मनसेच्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे राज ठाकरे शिंदे-फडणवीसांसोबत आगामी निवडणुकांत लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एवढे मजबूत आहेत की, त्यांना याची काहीही पर्वा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांना आहे. या तिघांचं रोज काहीतरी चालंलंय. पण तेही ठाकरेच आहेत. हे दोघं त्यांना कितपत मदत करतील…. या दोघांना लहर आली की ते काहीपण करतील, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भीतीमुळे, दहशतीमुळेच हे तिघे महायुतीत एकत्र आले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलंय.

एकूणत शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.