चक्रीवादळाचा धडकणार, 100 किमी वेगाने वाहणार वारे; या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: May 24, 2024 | 10:10 PM

आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात वादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ शनिवारी शनिवारी रात्रीपर्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल. ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा धडकणार, 100 किमी वेगाने वाहणार वारे; या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Follow us on

भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याचे नाव रेमल असे ठेवण्यात आले आहे. हे नाव ओमानने उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार दिले आहे.

आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, हे चक्रीवादळ शनिवारी शनिवारी रात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यानच्या किनाऱ्यावर ते धडकेल. रविवारी चक्रीवादळाच्या प्रभावाखाली वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. हवामान खात्याने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये २७-२८ मे रोजी अतिवृष्टी होऊ शकते. जेव्हा वादळ किनारपट्टीवर आदळते तेव्हा पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारी भागात 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात उपस्थित असलेल्या मच्छिमारांना 27 मे पर्यंत किनाऱ्याकडे परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याने 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील किनारपट्टी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. विभागाने 26-27 मे रोजी दक्षिण 24 परगणामध्ये 100 ते 110 किमी प्रति तास आणि उत्तर 24 परगणामध्ये 90 ते 100 किमी प्रति तास ते 110 किमी प्रति तास वाऱ्याचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किमी ते 100 किमी प्रतितास इतका आहे.