Shivdeep Lande: राजीनाम्यानंतर IPS शिवदीप लांडे यांच्यावर सरकारचा मोठा डाव, अचानक दिली मोठी जबाबदारी

| Updated on: Oct 10, 2024 | 2:13 PM

Bihar IPS Shivdeep Lande Transfer: शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत बिहार सरकारने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता शिवदीप लांडे काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.

Shivdeep Lande: राजीनाम्यानंतर IPS शिवदीप लांडे यांच्यावर सरकारचा मोठा डाव, अचानक दिली मोठी जबाबदारी
Shivdeep Lande
Follow us on

Bihar IPS Shivdeep Lande Transfer: महाराष्ट्रातील रहिवाशी शिवदीप लांडे बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. सोशल मीडियाद्वारे त्यांनी त्याची माहिती दिली होती. राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांच्याकडून धमाकेदार कामगिरी सुरु आहे. त्यांनी तनिष्क शोरुम प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने न केल्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. सरकारने त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला नाही. त्याच वेळी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) म्हणून पटण्यात बदली केली आहे.

सिंघम म्हणून प्रसिद्ध

शिवदीप लांडे बिहारमध्ये ‘सुपरकॉप’ आणि ‘सिंघम’ नावाने ओळखले जातात. त्यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यावर संपूर्ण बिहारमध्ये धक्का बसला. त्यांना आदर्श मानणारे अनेक युवकांमध्ये महाराष्ट्रातील युवक आहेत. ते महाराष्ट्रातील युवकांच्या नेहमी मार्गदर्शन आणि मदतही करत असतात. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यात झाला आहे. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पूर्णिमा येथील पटणा येथे बदली करण्यात आली आहे. शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

केवळ 33 दिवसांत बदली

केवळ 33 दिवसांत त्यांची पुन्हा बदली झाली आहे. त्यांनी 6 सप्टेंबर रोजी पूर्णिमाचे आयजी म्हणून कार्यभार घेतला होता. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. मुझफ्फरपूरमधील भूमाफियावर केलेल्या कारवाईमुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.

हे सुद्धा वाचा

बिहार सरकारकडून मोठी जबाबदारी

शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसामान्यमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत बिहार सरकारने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता शिवदीप लांडे काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे. 19 सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे बिहारमध्येच राहणार असल्याचे म्हटले होते. ते राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.