‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने 10 रुपयांत केलं होतं लग्न; बसमधून निघालेली वरात

| Updated on: Jul 12, 2024 | 11:08 AM

देशभरात सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तब्बल 5000 कोटी रुपयांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने अवघ्या 10 रुपयांत लग्न केलं होतं. या लग्नासाठी तो बसने गेला होता.

1 / 5
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सध्या देशभरात उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. तब्बल 5000 कोटी रुपयांचं हे लग्न असल्याचं म्हटलं जातंय. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीत एक असाही अभिनेता आहे, ज्याने फक्त दहा रुपयांत लग्न केलं होतं. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आहे.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. सध्या देशभरात उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. तब्बल 5000 कोटी रुपयांचं हे लग्न असल्याचं म्हटलं जातंय. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीत एक असाही अभिनेता आहे, ज्याने फक्त दहा रुपयांत लग्न केलं होतं. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आहे.

2 / 5
आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना ही आमिरची शेजारी होती असं म्हटलं जातं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले.

आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना ही आमिरची शेजारी होती असं म्हटलं जातं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले.

3 / 5
आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. एका मुलाखतीत आमिरने रिनासोबतच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि या लग्नाचा खर्च अवघे दहा रुपये होता.

आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. एका मुलाखतीत आमिरने रिनासोबतच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि या लग्नाचा खर्च अवघे दहा रुपये होता.

4 / 5
“मी रिनाशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. आमच्या बाजूने तीन साक्षीदार होते. रिनासोबतचं माझं लग्न सर्वांत किफायतशीर होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी 211 नंबरची बस पकडली आणि 50 पैशांची तिकिट काढली. वांद्रे पश्चिमला उतरून मी ब्रीजवरून पूर्वेला गेलो. तिथून मी हायवेच्या दिशेने चालत गेलो. हायवे ओलांडून मी गृहनिर्माण भवनात प्रवेश केला. तिथेच मॅरेज रेजिस्ट्रारचं ऑफिस होतं. अशा पद्धतीने माझं लग्न 10 रुपयांच्या आत झालं होतं”, असं त्याने सांगितलं होतं.

“मी रिनाशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. आमच्या बाजूने तीन साक्षीदार होते. रिनासोबतचं माझं लग्न सर्वांत किफायतशीर होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी 211 नंबरची बस पकडली आणि 50 पैशांची तिकिट काढली. वांद्रे पश्चिमला उतरून मी ब्रीजवरून पूर्वेला गेलो. तिथून मी हायवेच्या दिशेने चालत गेलो. हायवे ओलांडून मी गृहनिर्माण भवनात प्रवेश केला. तिथेच मॅरेज रेजिस्ट्रारचं ऑफिस होतं. अशा पद्धतीने माझं लग्न 10 रुपयांच्या आत झालं होतं”, असं त्याने सांगितलं होतं.

5 / 5
लग्नाच्या काही वर्षांनंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर रिनाने मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद यांचं पालकत्व घेतलं. "तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रिना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही”, असं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता.

लग्नाच्या काही वर्षांनंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर रिनाने मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद यांचं पालकत्व घेतलं. "तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रिना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही”, असं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता.