T20 World Cup 2024 : उंच, उंच लाटा, वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाचा 240 KM चक्रीवादळाशी सामना, PHOTOS

| Updated on: Jul 02, 2024 | 9:17 AM

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने शनिवारी दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. अटी-तटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. पण अजूनही भारतीय संघ मायदेशी परतू शकलेला नाही. कारण बार्बाडोसमध्ये आलेल्या वादाळाने टीम इंडियाचा परतीचा मार्ग रोखून धरला आहे.

1 / 5
टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. रोमांचक फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सगळ्या देशवासियांच स्वप्न साकार केलं. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला.

टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. रोमांचक फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सगळ्या देशवासियांच स्वप्न साकार केलं. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला.

2 / 5
हरिकेन बेरिल हे वादळ बार्बाडोसला धडकलं. हे कॅटेगरी 4 च वादळ होतं. या वादळामुळे टीम इंडियाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला. या वादळामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. मुसळधार पाऊस कोसळतोय. बार्बाडोसमधील एअरपोर्ट् सुद्धा बंद आहेत.

हरिकेन बेरिल हे वादळ बार्बाडोसला धडकलं. हे कॅटेगरी 4 च वादळ होतं. या वादळामुळे टीम इंडियाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला. या वादळामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. मुसळधार पाऊस कोसळतोय. बार्बाडोसमधील एअरपोर्ट् सुद्धा बंद आहेत.

3 / 5
स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर पडू नका असं अपील केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेल रुममध्ये थांबाव लागलं. वीज-पाणी ही व्यवस्था ठप्प झाली. अनेक घरांच छप्पर उडालं. वृक्ष उन्मळून पडले. रस्ते पाण्याखाली गेले.

स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर पडू नका असं अपील केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेल रुममध्ये थांबाव लागलं. वीज-पाणी ही व्यवस्था ठप्प झाली. अनेक घरांच छप्पर उडालं. वृक्ष उन्मळून पडले. रस्ते पाण्याखाली गेले.

4 / 5
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच रॉबिन सिंह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहे. बेरिल वादळामुळे तो सुद्धा हॉटेलमध्ये अडकला आहे. बार्बाडोसमधील हॉटेलमधून शूट केलेले काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेत. प्रचंड वेगात वारे वाहत असून भयावह स्थिती असल्याच त्यांनी म्हटलय.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच रॉबिन सिंह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहे. बेरिल वादळामुळे तो सुद्धा हॉटेलमध्ये अडकला आहे. बार्बाडोसमधील हॉटेलमधून शूट केलेले काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेत. प्रचंड वेगात वारे वाहत असून भयावह स्थिती असल्याच त्यांनी म्हटलय.

5 / 5
बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. बार्बाडोसमधील वादळाचा जोर आज शांत होईल. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होईल.

बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. बार्बाडोसमधील वादळाचा जोर आज शांत होईल. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होईल.