इतका द्वेष केल्याबद्दल धन्यवाद म्हणत ‘अनुपमा’मधील अभिनेत्याने सोडली मालिका

| Updated on: May 09, 2024 | 3:43 PM

'अनुपमा' या मालिकेत तोषुची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष मेहरोत्राने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली. आशिष गेल्या चार वर्षांपासून या मालिकेत काम करत होता.

1 / 5
'अनुपमा' ही स्टार प्लस वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमी अग्रस्थानी असते. गेल्या काही काळात या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला, तर काही नव्या कलाकारांची यामध्ये एण्ट्री झाली. आता मालिकेत चार वर्षे काम केल्यानंतर आणखी एका अभिनेत्याने एग्झिटचा निर्णय घेतला आहे.

'अनुपमा' ही स्टार प्लस वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमी अग्रस्थानी असते. गेल्या काही काळात या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला, तर काही नव्या कलाकारांची यामध्ये एण्ट्री झाली. आता मालिकेत चार वर्षे काम केल्यानंतर आणखी एका अभिनेत्याने एग्झिटचा निर्णय घेतला आहे.

2 / 5
मालिकेत अनुपमाचा मुलगा तोषुची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष मेहरोत्रा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आशिषने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

मालिकेत अनुपमाचा मुलगा तोषुची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष मेहरोत्रा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आशिषने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

3 / 5
'हा अत्यंत सुंदर प्रवास होता. अनुपमामध्ये तोषुच्या रुपात जवळपास चार वर्षांचा सुंदर प्रवास.. एक व्यक्ती म्हणून मी जसा आहे, त्याच्या अगदी विरोधात जाऊन भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक होतं. पण हे काम करताना मला खूप मजा आली', असं त्याने लिहिलं आहे.

'हा अत्यंत सुंदर प्रवास होता. अनुपमामध्ये तोषुच्या रुपात जवळपास चार वर्षांचा सुंदर प्रवास.. एक व्यक्ती म्हणून मी जसा आहे, त्याच्या अगदी विरोधात जाऊन भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक होतं. पण हे काम करताना मला खूप मजा आली', असं त्याने लिहिलं आहे.

4 / 5
'या प्रवासादरम्यान मला खूप चांगले लोक भेटले आणि ते आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहेत. मी माझ्या प्रेक्षकांचेही आभार मानतो. माझा इतका द्वेष केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला लवकरच दुसऱ्या रुपात किंवा कदाचित माझ्या खऱ्या रुपात पाहू शकाल', अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

'या प्रवासादरम्यान मला खूप चांगले लोक भेटले आणि ते आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहेत. मी माझ्या प्रेक्षकांचेही आभार मानतो. माझा इतका द्वेष केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला लवकरच दुसऱ्या रुपात किंवा कदाचित माझ्या खऱ्या रुपात पाहू शकाल', अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
आशिषने अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून त्याला भरपूर प्रेम मिळालं. जेव्हापासून ही मालिका सुरू झाली, तेव्हापासून तो यामध्ये काम करतोय. आता चार वर्षांनंतर त्याने या मालिकेला रामराम केला आहे.

आशिषने अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून त्याला भरपूर प्रेम मिळालं. जेव्हापासून ही मालिका सुरू झाली, तेव्हापासून तो यामध्ये काम करतोय. आता चार वर्षांनंतर त्याने या मालिकेला रामराम केला आहे.