आचार्य चाणक्य यांनी शिस्तीचे महत्त्व सांगितले आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात शिस्त नसते, तो त्याने मेहनतीने बनवलेल्या गोष्टी देखील खराब करतो. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम शिस्तीला जीवनाचा एक भाग बनवा. तुमची शिस्तच तुम्हाला यशाच्या पयऱ्या चढण्यास मदत करेल.
कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. जे नशिबावर अवलंबून असतात, त्यांना काहीच मिळत नाही. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल, तर कर्मावर विश्वास ठेवा आणि मनापासून काम करा. तुमचे कर्म जर योग्य असेल तर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळू शकतात.
जोखीम घेण्यास घाबरू नका हे देखील यशाचे तत्व आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोणताही विचार न करता निर्णय घ्या. प्रथम नीट तपासा, चाचणी करा आणि मगच निर्णय घ्या. निर्णय घेण्यापूर्वी, त्याचा परिणाम देखील विचारात घ्या जेणेकरून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
मनात सांघिक भावना असणे आवश्यक आहे कारण जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करायची असतील तर संघाला सोबत घेऊन जावे लागेल. मोठी उद्दिष्टे एकट्याने ठरवली जात नाहीत.
तुम्ही कोणताही निर्णय घेणार असाल तर सर्वप्रथम स्वतःला ३ प्रश्न विचारा की मी हे काम का करत आहे? याचा परिणाम काय होईल? ते यशस्वी होईल का? उत्तरे पटली तरच निर्णय घ्यां