बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. अनिल यांचं रवीना हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. अनिल, रवीना हिच्या खास मैत्रिणीचे पती होते. मैत्रिणीचा संसार मोडल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी 1996 मध्ये बोनी कपूर यांच्यासोबत लग्न. पण बोनी कपूरसोबत लग्नाआधी श्रीदेवी मोना शौरीची चांगली मैत्रिण होती असं म्हटलं जातं. पण बोनी कपूर आणि श्रीदेवी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं.
टीव्ही अभिनेत्री आणि राजनेता स्मृती इराणी यांनी देखील मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलं. यावर स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, 'मोना माझ्यापेक्षा 13 वर्ष मोठया आहेत. त्यामुळे त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण कधी असूच शकत नाहीत. तुमचे वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे खासगी आयुष्याबद्द काहीही बोलू नका...'
अमृता अरोरा हिच्यावर नीशा राणाचा पती शकील लडक याला चोरल्याचा आरोप आहे. अमृता अरोरा आणि शकील यांचं 2009 मध्ये लग्न झालं. अमृता अरोरा आणि नीशा राणा एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या असं दोखील सांगितलं जातं.
कृतिका मलिक हिच्यावर देखील खास मैत्रीण पायल मलिक हिचा पती चोरल्याचा आरोप आहे. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये कृतिका हिने अरमान याचा टॉवेल वापरल्यानंतर वक्तव्य केलं होतं. 'मी दुसऱ्याचा पती वापरू शकते तर, टॉवेल त्यासमोर काय आहे...'