IND vs SL : भारताला 1 रनची गरज असताना अर्शदीप आऊट होऊन माघारी परतल्यावर रोहितने वटारले डोळे, फोटो होतोय व्हायरल

| Updated on: Aug 03, 2024 | 4:57 PM

भारत आणि श्रीलंकेमधील पहिला सामना टाय झाला. तसं पाहायला गेलं तर हा सामना भारताने जिंकला होता मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. एक रनची गरज असताना अर्शदीप आऊट झाला, सामना संपल्यानंतर रोहितसमोर अर्शदीप आला तेव्हाचा फोटो व्हायरल झाला आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि श्रीलंकेमझध्ये झालेल्या वन डे मालिकेतील पहिला सामना टाय झाला. टीम इंडियाने सामना जिंकल्यात जमा होता मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर रोखून धरलं.

टीम इंडिया आणि श्रीलंकेमझध्ये झालेल्या वन डे मालिकेतील पहिला सामना टाय झाला. टीम इंडियाने सामना जिंकल्यात जमा होता मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर रोखून धरलं.

Twitter
2 / 5
भारताला श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 231 धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करण्यात टीम इंडियाला अपयश आलं. टीम इंडियाच्या ओपर्सनी चांगली सुरूवात केली होती. परंतु तरीही सामना टाय झाला. कॅप्टन रोहित शर्मा याची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.

भारताला श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 231 धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करण्यात टीम इंडियाला अपयश आलं. टीम इंडियाच्या ओपर्सनी चांगली सुरूवात केली होती. परंतु तरीही सामना टाय झाला. कॅप्टन रोहित शर्मा याची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.

Twitter
3 / 5
 विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही. बऱ्याच दिवसांनी कमबॅक करणाऱ्या के.एल. राहुल आणि  अक्षर पटेल यांनी डाव सावरला होता. दोघेही टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र दोघांच्याही झटपट विकेट गेल्याने भारताला विजय मिळवता आला नाही.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही. बऱ्याच दिवसांनी कमबॅक करणाऱ्या के.एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला होता. दोघेही टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र दोघांच्याही झटपट विकेट गेल्याने भारताला विजय मिळवता आला नाही.

4 / 5
विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या घेतली होतीत. मात्र 23 धावांवर असाताना हसरंगाने त्याला आऊट केलं. चेस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीकडून सर्वांना अपेक्षा होत्या. परंतु कोहलीही पहिल्या वन डे सामन्यात अयशस्वी ठरला.

विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या घेतली होतीत. मात्र 23 धावांवर असाताना हसरंगाने त्याला आऊट केलं. चेस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीकडून सर्वांना अपेक्षा होत्या. परंतु कोहलीही पहिल्या वन डे सामन्यात अयशस्वी ठरला.

5 / 5
टीम इंडियाच्या 8 विकेट गेल्या होत्या. 14 बॉलमध्ये फक्त एका धावेची गरज असताना स्ट्राईकवर असलेला अर्शदीप सिंह शून्यावर आऊट झाला, त्यानंतर अर्शदीप हा रोहितसमोर आला त्यावेळी कॅप्टनने त्याच्यावर चांगलेच डोळे वटारल्याचं दिसून आलं. त्यावेळी अर्शदीप हा खाली पाहत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

टीम इंडियाच्या 8 विकेट गेल्या होत्या. 14 बॉलमध्ये फक्त एका धावेची गरज असताना स्ट्राईकवर असलेला अर्शदीप सिंह शून्यावर आऊट झाला, त्यानंतर अर्शदीप हा रोहितसमोर आला त्यावेळी कॅप्टनने त्याच्यावर चांगलेच डोळे वटारल्याचं दिसून आलं. त्यावेळी अर्शदीप हा खाली पाहत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.