जल हे जीवन आहे, हे तर आपण सर्वजण जाणतोच. शरीरासाठी अतिशय आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास किंवा अयोग्य पद्धतीने केल्यास त्याचे तोटे असतात. तसेच पाण्याबाबतीतही आहे. काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया...
जर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे खात असाल तर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. शेंगदाण्यांमध्ये तेल असते. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास फूड पाईपमध्ये फॅट जमा होण्याची शक्यता असते.
कोणतीही आंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसे केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो.
दूध प्यायल्यावर अथवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास त्या व्यक्तीच्या पीएच लेव्हलवर परिणाम होतो. खरंतर दुधावर पाणी प्यायल्यानंतर पचनक्रियेची पीएच व्हॅल्यू असंतुलित होऊ लागते.
रसदार स्ट्रॉबेरी खायला सर्वांनाच आवडते. पण त्याचेही सेवन केल्यावर कधीच पाणी पिऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर व यीस्ट असते. फळ खाल्यानंतर पाणी प्यायले तर पोटातील ॲसिड डायल्युट होते व ते गॅसेस तसेच ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते.