जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करणारा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याने अनेक जनावरे आणि पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले केले होते.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.
जुन्नर परिसरात अनेक बिबटे आहेत. त्यामुळे एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी या परिसरात अन्य बिबटे गावात येऊन हल्ला करु शकतात, अशी भीती वनविभागच्या कर्मचाऱ्यांना आहे.
जुन्नर परिसरातील अनेक भागांत आणि शेतांमध्ये भर दिवसादेखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. यामुळे नागरिकांची चिंता कायम असते.