प्रत्येक भाजीमध्ये काही पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीराच्या विविध क्रियांना मदत करतात. प्रत्येक भाजीमध्ये काही गुणधर्म असतात. जे कर्करोग, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या टाळण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा.
पालक प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि कॅल्शियमसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. फक्त 30 ग्रॅम पालक तुमच्या शरीरात 56% व्हिटॅमिन ए पुरवतो. पालक कर्करोग, टाइप 2 मधुमेह, दमा, कमी रक्तदाब आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.
गाजरमध्ये के, ए आणि सी जीवनसत्त्वे, पोटॅशियम असते. बीटा कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट देखील आहे जे विविध प्रकारचे कर्करोग टाळण्यास सक्षम आहे. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये गाजराचा समावेश करा.
रताळ्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि मॅंगनीज असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. त्यात व्हिटॅमिन ए देखील असते जे स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत करते.