उन्हाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर गेले की, जीव लाही लाही होतो आहे. उन्हाळ्याच्या हंगामात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
शरीरात मीठ आणि पाण्याची कमतरता असते. डिहायड्रेशनमुळे शरीरात अनेक आजार होतात. त्यामुळे यावेळी जास्त पाणी प्या. फळांचा रस प्या आणि ताकाचा देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा
डिहायड्रेशनमुळेही शरीरात वेदना होतात. त्याला हीट क्रॅम्प असेही म्हणतात. त्यामुळे पाय, हात, पाठ इत्यादींना सर्वाधिक इजा होते. यासाठीही शरीराला पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. यामुळे या हंगामात जास्तीत-जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
अति उष्णतेमध्ये शरीराचे तापमानही वाढते. या काळात आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि आपल्याला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे त्वचेवर घाम येतो. हा घाम आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात आपल्या त्वचेची सर्वात वाईट अवस्था होते. घाम आणि गरम वातावरणात जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेवर पुरळ उठणे, पुरळ अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे नेहमी सनस्क्रीन वापरा.