चुकीच्या लग्नात घालवली 10 वर्षे, दोन मुलांनंतरही सुधारला नाही पती, अभिनेत्री म्हणाली “समाजात 100 अफेअर्स..”

| Updated on: May 16, 2024 | 3:06 PM

पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर नादियाने रिटायर्ड पीएएफ फायटर पायलट फैजल मुमताज रावशी दुसरं लग्न केलं. या दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलंय. नादियाने अनेक हिट शोजमध्ये काम केलंय. डॉली डार्लिंग, ऐसी है तनहाई, बंधन, भ्रम, कोई तो हो, पहजान यांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

1 / 5
नादिया खान ही पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री आहे. 'नादिया खान शो' हा प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. एका टॉक शोमध्ये नादियाने तिच्या लग्नातील वादाचा खुलासा केला. नादियाचं पहिलं लग्न खवर इक्बालशी झालं होतं.

नादिया खान ही पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री आहे. 'नादिया खान शो' हा प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. एका टॉक शोमध्ये नादियाने तिच्या लग्नातील वादाचा खुलासा केला. नादियाचं पहिलं लग्न खवर इक्बालशी झालं होतं.

2 / 5
खवर आणि नादिया यांना दोन मुलं आहेत. बरीच वर्षे एकत्र राहिल्यानंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर अखेर तिने पतीला घटस्फोट दिला. नादियाने सांगितलं की तिचं हे लव्ह मॅरेज होतं आणि पूर्व पतीने तिला प्रपोज केलं होतं. मात्र दोघं डेटवर गेले नव्हते. दुसऱ्या भेटीनंतर त्यांनी थेट साखरपुडा केला.

खवर आणि नादिया यांना दोन मुलं आहेत. बरीच वर्षे एकत्र राहिल्यानंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर अखेर तिने पतीला घटस्फोट दिला. नादियाने सांगितलं की तिचं हे लव्ह मॅरेज होतं आणि पूर्व पतीने तिला प्रपोज केलं होतं. मात्र दोघं डेटवर गेले नव्हते. दुसऱ्या भेटीनंतर त्यांनी थेट साखरपुडा केला.

3 / 5
"मी फार मोकळ्या विचारसरणीची नाही. म्हणूनच लग्नात खुश नसतानाही मी पूर्व पतीसोबत दहा वर्षे सोबत राहिली. मला दहा मिनिटांत समजलं होतं की हे लग्न चुकीचं आहे. पण त्यानंतरही मी दहा वर्षांचा संसार केला. पतीला घटस्फोट द्यावा असा विचारसुद्धा माझ्या मनात येत नव्हता", असं तिने सांगितलं.

"मी फार मोकळ्या विचारसरणीची नाही. म्हणूनच लग्नात खुश नसतानाही मी पूर्व पतीसोबत दहा वर्षे सोबत राहिली. मला दहा मिनिटांत समजलं होतं की हे लग्न चुकीचं आहे. पण त्यानंतरही मी दहा वर्षांचा संसार केला. पतीला घटस्फोट द्यावा असा विचारसुद्धा माझ्या मनात येत नव्हता", असं तिने सांगितलं.

4 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "आमच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या होत्या. मी विचार केला की ही माझ्या नशिबी आलेली शिक्षा असो किंवा आणखी काही.. पण मी माझ्या नात्याला टिकवेन. या नात्याला वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले नाही, ही खंत मला ठेवायची नव्हती. पण यात दहा वर्षे मी माझं मन मारून राहिले. अल्लाहने माझी परीक्षा घेतली होती."

याविषयी ती पुढे म्हणाली, "आमच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या होत्या. मी विचार केला की ही माझ्या नशिबी आलेली शिक्षा असो किंवा आणखी काही.. पण मी माझ्या नात्याला टिकवेन. या नात्याला वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले नाही, ही खंत मला ठेवायची नव्हती. पण यात दहा वर्षे मी माझं मन मारून राहिले. अल्लाहने माझी परीक्षा घेतली होती."

5 / 5
दोन मुलांच्या जन्मानंतरही पतीच्या स्वभावात काहीच बदल झाले नव्हते, असं तिने सांगितलं. नादियाने तिच्या आईवडिलांकडेही कधी याबद्दलची तक्रार केली नव्हती. "आपल्या समाजाची वाईट गोष्ट म्हणजे लोक एखाद्याच्या 100 अफेअर्सकडे दुर्लक्ष करतील पण अयशस्वी लग्नाकडे नाही", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

दोन मुलांच्या जन्मानंतरही पतीच्या स्वभावात काहीच बदल झाले नव्हते, असं तिने सांगितलं. नादियाने तिच्या आईवडिलांकडेही कधी याबद्दलची तक्रार केली नव्हती. "आपल्या समाजाची वाईट गोष्ट म्हणजे लोक एखाद्याच्या 100 अफेअर्सकडे दुर्लक्ष करतील पण अयशस्वी लग्नाकडे नाही", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.