न्यूझीलंडने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करत इतिहास रचला. न्यूझीलंड भारताला मायदेशात व्हाईटवॉश करणारी पहिली टीम ठरली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 3-0 ने गमावली. त्यामुळे रोहितचा कर्णधार म्हणून नको त्या यादीत समावेश झाला आहे.
न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात रोहितसेनेचा धुव्वा उडवला. त्यासह कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.
रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 16 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 5 सामने गमावले आहेत.
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक सामने गमावले आहेत. पतौडींनी भारताचं मायदेशात 27 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 9 वेळा भारताचा पराभव झाला.
कपिल देव या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. देव यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले. तर 4 सामन्यात पराभूत व्हावं लागंल.
मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.