अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून होते. अखेर 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्यासाठी देशातील काही मोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. परंतु ते दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे कुजबूज सुरु झाली आहे. पण गैरहजेरीमागचं कारण आता पुढे आलं आहे.
विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे राम मंदिर सोहळ्यात उपस्थित राहिला नाही. बीसीसीआयच्या ट्वीटनंतर ही बाब उघड झाली आहे. कारण विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यातही खेळणार नाही. तर रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी प्रशिक्षण शिबिरात हैदराबादमध्ये राहणे पसंत केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ चार दिवसांच्या सराव शिबिरासाठी हैदराबादला पोहोचला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 25 जानेवारीपासून सलामीचा सामना सुरू होईल.
21 जानेवारी (रविवार) रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक पर्यायी नेट सत्र आयोजित करण्यात आले होते. पण, रोहित शर्माने ही गोष्ट चुकवली. मुंबईतील बीकेसी मैदानावर त्याने वैयक्तिक सराव केला होता.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.