फॉग सिटीत पर्यटकांची गर्दी, डोंगर अन् धबधब्यांचे शहर असलेल्या इगतपुरीला का म्हणतात ‘फॉग सिटी’

| Updated on: Jul 15, 2024 | 8:32 AM

fog city igatpuri: नाशिक शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले इगतपुरी शहर निसर्गरम्य पर्यटनासाठी ओळखले जाते. पावसाळ्यात वाहणारे धबधबे, हिरवेगार डोंगर आणि धूके पाहण्यासाठी पर्यटक मुंबईतून इगतुपरीला येत असतात.

1 / 5
नाशिक जिल्ह्यातील लहान शहर असलेले इगतपुरी फॉग सिटी म्हणून ओळखले जाते. कारण या शहरात धूके मोठ्या प्रमाणावर असते. घाटन देवी मंदिराजवळ फॉग पाईंटच आहे. या ठिकाणी वर्षांतून आठ महिने तरी धूके असते.

नाशिक जिल्ह्यातील लहान शहर असलेले इगतपुरी फॉग सिटी म्हणून ओळखले जाते. कारण या शहरात धूके मोठ्या प्रमाणावर असते. घाटन देवी मंदिराजवळ फॉग पाईंटच आहे. या ठिकाणी वर्षांतून आठ महिने तरी धूके असते.

2 / 5
इगतपुरीचे आल्हाददायक हवामान, सुंदर ऐतिहासिक किल्ला, धबधबे आणि डोंगर यामुळे हे हिलस्टेशन पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. पावसाळ्यात, घनदाट जंगले हिरवीगार होतात आणि धबधबे जिवंत होतात.

इगतपुरीचे आल्हाददायक हवामान, सुंदर ऐतिहासिक किल्ला, धबधबे आणि डोंगर यामुळे हे हिलस्टेशन पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. पावसाळ्यात, घनदाट जंगले हिरवीगार होतात आणि धबधबे जिवंत होतात.

3 / 5
इगतपुरी ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येतात. या भागात किल्ले असल्याने, गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी हे नंदनवन आहे. इगतपुरीत अनेक धबधबेही प्रवाहीत होतात.

इगतपुरी ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येतात. या भागात किल्ले असल्याने, गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी हे नंदनवन आहे. इगतपुरीत अनेक धबधबेही प्रवाहीत होतात.

4 / 5
इगतपुरी मुंबईपासून जवळ असल्यामुळे एका दिवसाच्या पर्यटनासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर या ठिकाणी येतात. मुंबईवरुन कसारापर्यंत लोकल असून त्यानंतर टॅक्सीने अर्ध्यातासात इगतपुरी गाठता येते. तसेच मुंबईवरुन सरळ रेल्वेही इगतपुरीसाठी आहेत.

इगतपुरी मुंबईपासून जवळ असल्यामुळे एका दिवसाच्या पर्यटनासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर या ठिकाणी येतात. मुंबईवरुन कसारापर्यंत लोकल असून त्यानंतर टॅक्सीने अर्ध्यातासात इगतपुरी गाठता येते. तसेच मुंबईवरुन सरळ रेल्वेही इगतपुरीसाठी आहेत.

5 / 5
पर्यटनस्थळावर होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने पर्यटनासाठी बंदी घातली आहे. त्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. बंदी घालण्याऐवजी पर्यटकांच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटक करत आहेत.

पर्यटनस्थळावर होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने पर्यटनासाठी बंदी घातली आहे. त्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. बंदी घालण्याऐवजी पर्यटकांच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटक करत आहेत.