महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आज भारतीय संघानं इंडिजला 155 रनानं हरवलं आहे. या भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होतंय
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीनं इंडिजला धो धो धुतलंय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरली होती.
मिताली राजनं एक अनोखा विक्रम केला आहे. ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मिताली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.
स्मृती आणि हरमनप्रीतनेही आपल्या खेळीने काही आश्चर्यकारक विक्रम केले. यांनी तीन विकेट्सवर 78 धावा करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शतकांचा विक्रमही मोडला. 1982 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये केवळ एकच शतक झळकावले होते.
वेस्ट इंडिजला भारतानं 318 रनचं लक्ष दिलं होतं. पण, वेस्ट इंजिला ते पूर्ण करता आलं नाही. वेस्ट इंडिजला 162 रनंच बनवता आले. अखेर वेस्ट इंडिज भारताच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर हरला.