Balasaheb Thorat : मातोश्रीवरुन बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाच वक्तव्य

| Updated on: Oct 26, 2024 | 2:27 PM

Balasaheb Thorat : "राजकराणात भाषण करण्याचा, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण दुर्देवाने मागच्या पाच वर्षात पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय" असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : मातोश्रीवरुन बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाच वक्तव्य
balasaheb thorat
Follow us on

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मविआमध्ये अजूनही काही जागांवर जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात बाहेर येऊन मीडियाशी बोलले. “उद्धव ठाकरेंसोबत मी चर्चा केलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना भटेण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार चर्चेमध्ये होता. त्या दृष्टीने काही चर्चा झाली. काही विषय असे असतात, ज्यात प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं आवश्यक असतं. बैठकीत जे झालं ते मी चेन्नीथला आणि खरगे साहेबांना सांगणार” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“काही कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत. राहुलजी, उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन काही कार्यक्रम करायचे आहेत. त्या विषयी चर्चा झाली” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवस बाकी आहेत, किती जागांवर चर्चा बाकी आहे? यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अशा गोष्टी निवडणुकीत शेवट्च्या क्षणापर्यत चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती अजिबात करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त जागा जिंकून आणणार. आम्ही 180 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. आम्हाला सरकार आणायच आहे. मुख्यमंत्री बसवायचा आहे”

मुलीसंदर्भात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

जयश्री थोरात यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारलं. “राजकराणात भाषण करण्याचा, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण दुर्देवाने मागच्या पाच वर्षात पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “सुजय विखे पाटील संगमनेर तालवुक्यात येतात, त्याचा तो अधिकार आहे. भाषण कोणात्या थराच करतात. जयश्री संदर्भातील वक्तव्याचा निषेध सुरु आहे. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. जयश्री थोरात संगमनेरमध्ये परिस्थिती संभाळायला समर्थ आहे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.