‘मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरता’, ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Oct 25, 2024 | 12:43 PM

"एकनाथ शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता त्याच काय झालं?. आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुक्या धमक्या देतो का? वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्य मागे माजी आमदार लागणार" अशी टीका नितेश राणेंनी केली.

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरता, ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे
Image Credit source: ANI
Follow us on

“महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत, त्यातल्या किती जगा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या?. स्वतःच्या मित्र पक्षाला भीक न घालण्याचे काम उबाठाकडून होतय. दिल्लीत ज्या जागांची चर्चा प्रलंबित होती, त्या जागा उद्धव ठाकरे जाहीर करुन झाले आहेत. जो उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तॊ काँग्रेस आणि शरद पवार गटाचा होईल का?” अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली. “बेईमानी शिवाय उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही. काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही” असा मुद्दा नितेश राणे यांनी उपस्थित केला.

“आज उद्धव ठाकरेला भाजपाची आठवण आली असेल, तेव्हा 120 जागा मिळाल्या. पण आता नाक रगडून 100 मिळत नाहीत. काँग्रेसने विचार करावा उद्धव ठाकरेंने कोकणात राष्ट्रीय काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता त्याच काय झालं?. आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुक्या धमक्या देतो का? वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्य मागे माजी आमदार लागणार” अशी टीका नितेश राणेंनी केली.

राहुल गांधींना मातोश्रीचा पत्ता माहितीय का?

“बाळासाहेब ठाकरे असताना, सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे. 10 जनपथवरुन राहुल गांधी मातोश्रीवर आलाय का? त्याला मातोश्रीचा पत्ता माहित आहे का?. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखे फिरत आहेत” अशी टीका नितेश राणे यांनी केली.