जिंकलोच असतो… पण पनवतीने हरवलं; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

| Updated on: Nov 21, 2023 | 7:22 PM

राजस्थानच्या निवडणुकीत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी तर एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी अत्यंत खालची पातळी गाठत एकमेकांवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर थेट नरेंद्र मोदी यांना पनवती म्हटलं आहे. तर भाजपने राहुल गांधींच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

जिंकलोच असतो... पण पनवतीने हरवलं; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील या वर्षात चर्चेत राहिले. त्यांनी भारत जोडो यात्राच्या माध्यमातून देशात पदयात्रा केली. जानेवारी 2023 मध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता झाली. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. गौतम अदानी यांचे नाव घेऊन त्यांनी पीएम मोदींवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांना संसदेचे सदस्यत्वही गमवावे लागले आणि नंतर त्यांना न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला. वर्षाच्या अखेरीस संपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी जवळपास प्रत्येक व्यासपीठावर गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदींची नावे घेतली. मात्र, निवडणुकीत त्यांना तेलंगणातच यश मिळाले तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांचा पराभव झाला.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जयपूर | 21 नोव्हेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जालोरमध्ये मोठी रॅली केली. यावेळी त्यांनी वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

जालोर येथे एका प्रचंड सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच सभेला आलेल्या लोकांनी पनवती… पनवती अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधी यांनी हे उद्गार काढले. बरं वाईट काही का असेना आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला सर्व माहीत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आधीच जायचं ना

राहुल गांधी यांनी एकप्रकारे टीम इंडियाच्या पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडलं आहे. मोदींना स्टेडियममध्ये पाहून आपले खेळाडू दबावाखाली आले. त्यामुळे आपण पराभूत झालो. कारण खेळाडू तणावाखाली होते. तेच पराभवाचं एकमेव कारण आहे. त्यांना खेळाडूंचं मनोबलच वाढवायचं होतं तर वर्ल्डकपपूर्वीच खेळाडूंना भेटायचं होतं. अंतिम सामना पाहायला जाण्याची काहीच गरज नव्हती, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

पनवती शब्द चर्चेत कसा?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. त्यामुळे त्याच दिवशी अचानक पनवती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड करत होता. त्यामुळे विरोधकांनीही त्याचा आधार घेत पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदी स्वत: मोदी स्टेडियममध्ये आल्यामुळे टीम इंडिया पराभूत झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.