भारत स्वतंत्र झाल्यानंतर 13 महिने मराठवाड्यासह हैदराबादमधील अनेक भागांना पारतंत्र्याविरोधात, अत्याचाराविरोधात संघर्ष करावा लागला. स्वतंत्र भारताच्या मध्यभागी असलेल्या या लोकांचा अमानुष छळ झाला. स्त्रीयांवर अत्याचार झाले. अनेकांना जीवंत जाळण्यात आले. लुटालुटीची तर मोजदाद नाही. रझाकारांनी त्यावेळी या संस्थानात नंगानाच केला. त्याला निजाम, पाकिस्तान आणि इंग्रजांची फूस होती. भारतात अजून एक धर्मांध राष्ट्र तयार करण्याची पाकिस्तानची रणनीती होती. मराठवाड्यातील जनतेने, स्वामी रामानंद तीर्थ, अनेक लढवय्ये नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले. 224 वर्षांचे जुने हैदराबाद संस्थान अवघ्या 109 तासांत गुडघ्यावर आलं. दिल्लीवर झेंडा फडकविण्याचा स्वप्न पाहणारा रझाकारांचा नेता कासिम रिजवीचं पार पानीपत झालं. त्याचं भारताचा हिटलर व्हायचं स्वप्न धुळीस मिळालं. मग या रिजवीचं पुढे झाले काय? तो कुठे गेला? त्याच्यावर मुहाजिरचा शिक्का कसा बसला? कासिम रिजवी हा उपरा कासिम रिजवी हा लातूरचा असा समज आज पण आहे. त्याच्याविषयी बरेच संभ्रम आहे. तो मुळचा लातूरच...