WTC Final 2023 : त्यावेळी एक शब्दही का नाही बोललात? इरफान पठान-रवी शास्त्रींना सोयीस्कर विसर?

| Updated on: Jun 13, 2023 | 2:54 PM

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर BCCI ला बरेच सल्ले दिले जात आहेत. पण सल्ले देणारे IPL 2023 दरम्यान गप्प होते. आता बोलून काय उपयोग?

WTC Final 2023 : त्यावेळी एक शब्दही का नाही बोललात? इरफान पठान-रवी शास्त्रींना सोयीस्कर विसर?
irfan pathan-Ravi shastri
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी टीम इंडियाला हरवलं. भारताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियन टीम भारी पडली. त्यांनी रोहित शर्माच्या टीमला पुनरागमनाची कुठली संधीच दिली नाही. टीम इंडियाच्या WTC फायनलमधील पराभवानंतर IPL ला जबाबदार धरलं जातय.

चेतेश्वर पुजारा वगळता भारतीय स्क्वॉडमधील सर्व प्लेयर आयपीएल खेळून थेट लंडनला पोहोचले होते. फॅन्स पराभवासाठी आयपीएलला जबाबदार धरतायत.

त्यावेळी कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटमधील दिग्गजही आयपीएलच पराभवासाठी कारण असल्याच सांगतायत. महत्वाच म्हणजे या दिग्गजांनी आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंच भरपूर कौतुक केलं होतं. त्यावेळी ब्रेक बद्दल काही बोललेच नव्हते. आयपीएल सुरु होण्याआधीच भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भिडणार हे निश्चित होतं.

टि्वटमध्ये काय म्हटलं?

खेळाडूंना माहित होतं, लीग संपल्यानंतर त्यांना लंडनला जायचय. इरफान पठान, रवी शास्त्री आणि रिकी पॉन्टिंग स्वत: 2 महिने आयपीएलमध्ये व्यस्त होते. पठान आणि शास्त्री क़ॉमेंटेटर होते. पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सचे कोच होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप दरम्यान इरफान पठानने भारताच्या खराब गोलंदाजीमागे आयपीएल असल्याच म्हटलं होतं.

तो कधीही या मुद्दावर बोलला नाही

पठानने थेट आयपीएलच नाव घेतलं नव्हतं. पण टि्वट करुन असं लिहिल होतं की, “4 ओव्हर बॉलिंग केल्यानंतर एकदिवसात थेट 15 ते 20 ओव्हर बॉलिंग करणं मोठी जम्प असते” पठानला WTC फायनल दरम्यान ही गोष्ट आठवली. आयपीएल दरम्यान तो कधीही या मुद्दावर एकदाही बोलला नाही. सोशल मीडियावरही त्याने आयपीएल दरम्यान प्लेयर्स बद्दल बरच काही लिहिलं होतं. पण WTC फायनल बद्दल त्यात एक शब्दही नव्हता.

शास्त्रींनी बीसीसीआयला काय सल्ला दिला?

WTC मधील पराभवानंतर रवी शास्त्री यांनी, बीसीसीआयला आयपीएलच्या नियमांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिलाय. देशासाठी क्रिकेट की, आयपीएल हे तुम्हाला ठरवायच आहे. मोठ्या इवेंट्स दरम्यान खेळाडूंना आयपीएलमध्ये अनुमती मिळू नये, यासाठी आयपीएल कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज असला पाहिजे, असा सल्लाही शास्त्रींनी दिला. शास्त्री आयपीएल दरम्यान शुभमन गिल, विराट कोहली यांचं तोंडभरुन कौतुक करत होते. पण त्यावेळी त्यांना WTC फायनल आठवली नाही.