टीम इंडियाचा रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयरथ सुस्साट आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत सलग सातवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलच्या पराभवाचा वचपा घेतला आहे. टीम इंडियाने 172 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 16.4 ओव्हरमध्ये 103 धावांवर गुंडाळलं. टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध फायनलमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी भिडणार आहे. कॅप्टन रोहित शर्माला टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांची गेल्या 11 वर्षांची आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडियाने 23 जून 2013 रोजी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. तिथपासून टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरुन कॅप्टन रोहितला इंग्लंडला पराभूत केल्यानंतर यासंबंधित प्रश्न विचारण्यात आला. टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीपासून आता एक विजय दूर आहे. यावरुन कॅप्टन रोहितने उत्तर दिलंय. रोहित काय म्हणाला? हे आपण जाणून घेऊयात.
“आम्ही जास्त घाबरलो नाही आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे. चांगलं क्रिकेट खेळायचंय आणि अंतिम फेरीतही तसंच करायचंय. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, एवढेच मी सांगू शकतो. टीम चांगल्या स्थितीत आहे, सर्वच चांगले खेळत आहेत. फायनलमध्ये आणखी एक चांगला शो सादर करण्याची मला आशा आहे”, अशी प्रतिक्रया रोहित शर्माने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान दिली.
टीम इंडिया 2014 नंतर टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये
India remain unbeaten 😤
They face South Africa in the #T20WorldCup 2024 Final in Barbados. pic.twitter.com/HB2ZIG8yT7
— ICC (@ICC) June 27, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.