टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी फक्त दोन तास बाकी आहेत. या सामन्याआधी पावसाने जोरदार बॅटींग मैदानामध्ये केली आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यासाठी उशिर होण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकामधील फायनल सामन्याला 8 वाजता सुरूवात होणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस या ठिकाणी पार पडणार आहे.
आजच्या फायनल सामन्यामध्ये एक असा निर्णय बदलण्यात आलाय ज्याची जोरदार यामागे झाली होती. आजच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर झाली, पण ती सुपर ओव्हरही जर टाय झाली तर विजेता कोणाला घोषणा करणार?
वन डे वर्ल्ड कप 2019 मध्ये जेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये फायनल सामन्यात सुपर ओव्हर झाली होती. त्यावेळी सर्वाधिक चौकार कोणी मारले त्यावरून इंग्लंड संघाला विजयी ठरवण्यात आलं होतं.
दरम्यान, आयसीसीवर जोरदार टीका झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे आजच्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर परत सुपर ओव्हर खेळावी लागणार आहे. जोपर्यंत सुपर ओव्हरमध्ये जो संघ विजय मिळवत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर होणार असल्याचा निर्णय घेतला गेलाय.