BSNL कडून सर्वांची हवा टाइट, 82 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, फ्री कॉलिंग अन् रोजी 1.5 जीबी डेटा

| Updated on: Sep 17, 2024 | 9:53 AM

BSNL Vs JIO: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलबाबत मोठी माहिती दिली होती. बीएसएनएल 4जी सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी बीएसएनएल 4जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.BSNL सध्या 4G नेटवर्कवर वेगाने काम करत आहे.

BSNL कडून सर्वांची हवा टाइट, 82 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, फ्री कॉलिंग अन्  रोजी 1.5 जीबी डेटा
BSNL
Follow us on

खासगी मोबाईल कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यापासून सरकारी कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेडला (BSNL) चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांत लाखो जणांनी खासगी कंपनीतून आपले सिम कार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट केले आहेत. आता करोडो मोबाईल वापरकर्ते BSNL 4G ची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL 4G सेवा लवकरच सुरू होणार आहे. येत्या काही महिन्यांत BSNL युजरला 4G इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.

बीएसएनएल इतर टेलिकॉम कंपन्यांना सतत स्पर्धा देत आहे. बीएसएनएलचे प्रीपेड प्लॅन एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियापेक्षा खूपच स्वस्त आहेत. त्याच वेळी, सरकारी कंपनी आपली 4G आणि 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

485 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 485 रुपयांचा प्लॅन 82 दिवसांच्या वैधतेसह आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय, प्लॅनमध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड नेटवर्कवर मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंग आणि डेटा लाभांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

बीएसएनएल 4जी सिम अशी करा एक्टिव्ह?

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये BSNL सिम इन्स्टॉल करा.
  • आता मोबाईल रिस्टार्ट करा आणि नेटवर्क सिग्नलची प्रतीक्षा करा.
  • नेटवर्क सिग्नल मिळाल्यावर 1507 डायल करा. तुमची माहिती पडताळून पाहा.
  • पडताळणीनंतर BSNL सिम सक्रिय होईल.

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले…

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलबाबत मोठी माहिती दिली होती. बीएसएनएल 4जी सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी बीएसएनएल 4जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.BSNL सध्या 4G नेटवर्कवर वेगाने काम करत आहे. कंपनीने 4G नेटवर्कसाठी आतापर्यंत सुमारे 22,500 मोबाईल टॉवर लावले आहेत. लवकरच ही संख्या एक लाखांच्या जवळपास पोहोचेल. तसेच 6G पेटंटमध्ये देशाचा 10 टक्के वाटा असेल. ते म्हणाले की, आमचे उद्दिष्ट केवळ तंत्रज्ञान आणणे नाही तर आम्ही भारतीय तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहोत.