लग्नापूर्वी आई नॉमिनी, लग्नानंतर मृत्यू झाल्यास पत्नी, मुलांना क्लेमचे पैसे मिळणार? जाणून घ्या

| Updated on: Mar 20, 2025 | 3:18 PM

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लग्नापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना किंवा भावंडांना आपल्या विमा पॉलिसीचे नॉमिनी बनवले होते. लग्नानंतर ती व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांना नॉमिनेट करू शकत नाही. त्या व्यक्तीची पत्नी, मूल आणि आई-वडील यांच्यात कायदेशीर वाद सुरू होतो. याविषयी पुढे जाणून घ्या.

लग्नापूर्वी आई नॉमिनी, लग्नानंतर मृत्यू झाल्यास पत्नी, मुलांना क्लेमचे पैसे मिळणार? जाणून घ्या
insurance policy
Image Credit source: Instagram
Follow us on

आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहोत. समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याच्या दाव्यासाठी एकट्या नॉमिनीलाच हक्क आहे का? किंवा त्या व्यक्तीचे कायदेशीर वारस विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दावा करू शकतात का? याविषयी पुढे जाणून घ्या.

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लग्नापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना किंवा भावंडांना आपल्या विमा पॉलिसीचे नॉमिनी बनवले होते. लग्नानंतर ती व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांना नॉमिनेट करू शकत नाही. त्या व्यक्तीची पत्नी, मूल आणि आई-वडील यांच्यात कायदेशीर वाद सुरू होतो.

उच्च न्यायालयाने ‘हे’ प्रकरण निकाली काढले

नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयात असेच एक प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये मुलाने लग्नाआधी आपल्या आईला इन्शुरन्स पॉलिसीचे नॉमिनी बनवले होते. लग्नानंतर पतीचा मृत्यू झाल्यानंतर विम्याच्या रकमेच्या दाव्यावरून पत्नी आणि आईमध्ये कायदेशीर विवाह सुरू झाला.

हे सुद्धा वाचा

कायदेशीर वारसांनाही अधिकार?

या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत म्हटले आहे की, विमा पॉलिसीमध्ये नॉमिनीला इन्शुरन्स पॉलिसीच्या संपूर्ण क्लेमवर अधिकार नसतो. मृत व्यक्तीचा कायदेशीर हक्क जर आपला दावा करत असेल तर त्यालाही विमा पॉलिसीचा दावा करण्याचा अधिकार असेल.

असे आहे प्रकरण?

हे प्रकरण निलव ऊर्फ निलाम्मा विरुद्ध चंद्रव्वा उर्फ चंद्रकला ऊर्फ हेमा आणि इतरांशी संबंधित आहे. विमा कायदा 1938 च्या कलम 39 चा अर्थ त्यात वारसा हक्काचा कायदा रद्द करावा, असा होत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

कायदेशीर वारसदाराला विम्याचा दावा करण्याचाही अधिकार

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांनी या प्रकरणी निकाल देताना म्हटले की, मृताच्या कायदेशीर वारसांनी दावा केला नाही तरच नॉमिनीला दाव्याचा पूर्ण लाभ मिळतो. कायदेशीर वारसदारांनी दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दावा केल्यास आणि नॉमिनीनेही दावा केल्यास ही रक्कम सर्व पक्षांमध्ये समान वाटली जावी. कायदेशीर वारसदारांमध्ये आई-वडील, पती-पत्नी, मुले इत्यादींचा समावेश होतो.

नुकत्याच समोर आलेल्या या प्रकरणात पतीने लग्नाआधी आपल्या आईला इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नॉमिनी बनवले होते. लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतरही त्या व्यक्तीने नॉमिनीचं नाव बदललं नाही. या व्यक्तीचा मृत्यू 2019 मध्ये झाला होता. यानंतर विम्याच्या रकमेवरून पत्नी आणि आईमध्ये वाद सुरू झाला.

विमा दाव्याची रक्कम मृताची आई, पत्नी आणि मुलांमध्ये एक तृतीयांश वाटण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.