अमरावती – त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटल्याचे पहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये तणाव होता. मात्र आता तणाव निवळला असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.