Pune crime : भिकारी बनून आल्या, २०० तोळे दागिने घेऊन पसार झाल्या

महिलांनी घरातील 1 कोटी रुपयांचे 200 तोळे सोन्याचे दागिने, परदेशी चलन, मौल्यवान घड्याळ आणि इतर वस्तूंची चोरी केली.

Pune crime : भिकारी बनून आल्या, २०० तोळे दागिने घेऊन पसार झाल्या
| Updated on: Jan 19, 2023 | 8:13 AM

पुणे : पुण्यातील ( PUNE ) उच्चभ्रू अशा पाषाण ( PASHAN )  भागातील सिंध सोसायटीत ( SINDH SOCIETY ) चोरीची घटना घडली. भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या तीन महिलांनी तब्ब्ल २०० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. फिल्मी स्टाईल घडलेल्या या घटनेचा तपास करून चोरांना अटक करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

सिंध सोसायटीत समीर दयाल यांचा बंगला आहे. भिकारी बनून आलेल्या त्या महिलांनी भीक मागण्याच्या निमित्ताने अनेक दिवस बंगल्याची रेकी केली. भिकारी असल्यामुळे दयाल याना त्यांची द्या येऊ लागली. त्यामुळे ते त्या महिलांना जेवण देत असत. हळूहळू त्यांचा परिचय वाढला. याचा फायदा घेत त्या महिलांनी बंगल्यातील सर्व माहिती घेतली.

11 डिसेंबरला काही कार्यक्रमानिमित्त दयाल कुटुंबीय बाहेर गेले. ही संधी साधून त्या महिलांनी घरातील 1 कोटी रुपयांचे 200 तोळे सोन्याचे दागिने, परदेशी चलन, मौल्यवान घड्याळ आणि इतर वस्तूंची चोरी केली. चतुर्श्रुंगी पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करत दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.