आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहे. संपूर्ण राज्यभरात भाजपची संवाद यात्रा निघणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसूख घेतलं. पंतप्रधान पदाबाबत बोलताना विरोधकांनी तारतम्य पाळलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत आम्ही असं वागत नाही. पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं म्हणून नरेंद्र मोदी हे लहान होणार नाही. इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत असंही बावनकुळेंनी म्हणत विरोधकांना फटकारलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणालाच चिंतेची गरज नाही. ज्यांनी खेळ मांडलेला त्यांना खेळ लखलाभ असो.. असं वक्तव्य करत बावनकुळे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.