मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखं भारतात परत येत असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवरायांनी वापरलेली वाघनखं लंडनहून १६ नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे. शिवरायांची वाघनखं ही तीन वर्ष भारतात असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपावर होताना दिसत आहे. तर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, राज्यात आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत राज्य सरकारने स्पष्टता करावी, या संदर्भातील माहिती राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. ती वाघनखं खरंच शिवरायांची आहे का? विरोधकांकडून होणाऱ्या अशा शंकावर भाजपचे नेते आशिष शेलार प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. ‘वाघनखे येणार कळताच नकली वाघ बिथरले’, असे म्हणत राऊत यांच्यासह ठाकरे गटावर शेलार यांनी टीका केली आहे.