मुंबई ते नाशिक महामार्गाची झाली अक्षरश: चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

जोरदार पर्जन्यवृष्टीने मुंबई ते नाशिक मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरील खड्डे चुकवित वाहनांना प्रवास करावा लागत असल्याने अपघात घडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई ते नाशिक महामार्गाची झाली अक्षरश: चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
| Updated on: Jul 25, 2024 | 5:32 PM

मुंबई सह राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाने जूलैमध्ये कहर केला आहे. पुणे जिल्ह्यासह रायगड, मुंबई ठाणे कोकण या भागाला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. पावसाने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक घरात पाणी गेले असून पुण्यात वीजेचा शॉक लागून तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या पावसाने अनेक अपघात घडले आहे. मुंबई ते नाशिक महामार्गाची तर पावसाने अगदी चाळण झाली आहे. या महामार्गावर वाडीवरे गावात रस्ता चिखल आणि खड्ड्यांनी भरलेला आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मुंबई ते नाशिक महामार्गावरील महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. जर रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर राजीनामे द्या अशा शब्दात भुसे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे.

 

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.