कालपासून रत्नागिरीमध्ये पावसाची चांगलीच बॅटिंग होतेय. मात्र आज पहाटेपासून मुसळधार पावसाने काहिशी विश्रांती घेतली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात सरींवर पाऊस बरसतो आहे. ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून पाऊस दडी मारून बसला होता त्याच पावसाने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मच्छीमारीला देखील ब्रेक मिळाला आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काही दिवसात कसा होणार पाऊस?