Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चिंता व्यक्त; म्हणाले....

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चिंता व्यक्त; म्हणाले….

| Updated on: Apr 09, 2023 | 7:45 AM

Rajesh Tope on Corona Virus : कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. सरकारने जागरूक राहून लोकांना जागृत करण्याची गरज आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

जालना : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दक्षता घेण्याची गरज असताना आरोग्य यंत्रणा आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी उपस्थित नसतात, असं माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीचे उपाय करणं गरजेचं आहे. मास्क लावणं, लस घेणं याबाबत एक धोरण ठरवण्याची गरज आहे. याशिवाय औषधांच्या उपलब्धतेची सरकारकडून पडताळणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले आहेत. राजेश टोपे जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 09, 2023 07:45 AM