Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस म्हणतात आमचं सरकार येणार, आलं का ?, जयंत पाटलांचा खोचक सवाल; पाहा संपूर्ण भाषण

| Updated on: Apr 15, 2021 | 8:34 PM

फडणवीस म्हणतात आमचं सरकार येणार, आलं का ?, जयंत पाटलांचा खोचक सवाल; पाहा संपूर्ण भाषण

पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीचा प्रचार चांगलाच बहरात आला आहे. येथे रोज महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आज (15 एप्रिल) जलसंपदामंत्री जंयत पाटील यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मागील 18 महिन्यांपासू ते राज्यात आमचं सरकार येणार असं म्हणत आहेत. पण ते आलं का  असा खोचक सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.