उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणूकांची घोषणा होणार, आचार संहिता लागू होणार

देशातील लोकसभा निवडणूकांच्या तारखांची उद्या शनिवारी दुपारी 3 वा. निवडणूक आयोग घोषणा करणार आहे. लोकसभा निवडणूका नेमक्या किती टप्प्यात होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असणाऱ्या देशात निवडणूका राबविणे मोठे कौशल्याचे काम असते. संपूर्ण जगाचे भारतीय निवडणूकांकडे लक्ष असते.

उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणूकांची घोषणा होणार, आचार संहिता लागू होणार
| Updated on: Mar 15, 2024 | 1:19 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखांसंदर्भात निवडणूक आयोग घोषणा करणार आहे. उद्या 16 मार्च, शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. या निवडणूका नेमक्या किती टप्प्यात होणार आहेत. या संदर्भात उत्सुकता लागून राहीली आहे. लोकसभा निवडणूकांच्या तारखांचा विचार करता अनेक मोठ्या राज्यात विविध टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या 543 जागांवर निवडणूका होणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलकांनी अनेक मतदार संघात एकाच जागांवर अनेक उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची ईव्हीएम मशिनवर निवडणूक कार्यक्रम घेताना अडचण होणार आहे. त्यामुळे यातून निवडणूक आयोग कसा मार्ग काढते याकडेही लक्ष लागले आहे. निवडणूक तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.