जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप, ‘तर माझा एन्काऊंटर…’

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेले अनेक महिने उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतू आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानंतर जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे आणि अजय महाराज यांनी परस्परांवर आरोपप्रत्यारोप केल्यानंतर यामागे देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची काही माणसे तसेत अजित पवार यांचे तीन आमदार यात सहभागी असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप, 'तर माझा एन्काऊंटर...'
| Updated on: Feb 25, 2024 | 3:20 PM

जालना | 25 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करुन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केला आहे. आपल्या गेले काही दिवस बदनाम करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा बामणीकावा आहे. परंतू हा मराठा तुम्हाला पुरुन उरेल असे आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गेले काही दिवस आरोप करणे सुरु केले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज ( रविवार 24 फेब्रुवारी ) सकाळी आपली भूमिका जाहीर करणार असे म्हटले होते. यानंतर आज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतील असा आरोप केला आहे. माझा एक तर एन्काऊंटर देखील करण्याचा प्रयत्न केला जाईल असाही आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आपला जर बळी घ्यायचा असेल तर आपण सागर बंगल्यावर आताच यायला तयार आहे असे सांगत जरांगे पाटील यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.