Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drought In Marathwada : मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना

Drought In Marathwada : मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना

| Updated on: Mar 23, 2025 | 3:16 PM

Jayakwadi Dam Water Level Drop : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मारठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलेला बघायला मिळत आहे. मारठवड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात केवळ 58 टक्के पाणीसाठा शिल्लक राहील असल्याची माहिती समोर आली आहे. बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणी साठयात घट झाली असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्याच्या प्रमुख 44 छोटे मोठे धरण मिळून केवळ 55 टक्के पाणी साठा उरलेला आहे. तर पाझर तलाव हे आत्ताच पूर्णपणे आटलेले बघायला मिळत आहे. त्यामुळे कडक्याच्या उन्हाळ्याचे 2 महीने कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आत्तापासूनच टँकरने पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल धरणातला पाणी साठा हा निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मारठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Published on: Mar 23, 2025 03:14 PM